शुक्रवार, १८ मार्च, २०११

आयुष्य....

रोजच्या प्रमाणे मी बेलापूर हून ट्रेन पकडली... नेहमीच्या जागेवर बसायला गेले...
पण आज तिथे 'ती' बसली होती...जरा रागच आला मला  तिचा...
माझी रोजची जागा तिने आज बळकावली होती... थोड्या घुश्यातच मी तिच्या बाजूला जाऊन बसले...
ती थोडी मळकटलेली होती म्हणून जरा लांबच बसले...
एकटक बाहेर बघत होती... तिच्या कुशीत तिची चिमुकली होती...
ती रडली कि ती तिची शून्यातली नजर काढून तिच्या मुलीला शांत करायचा प्रयत्न करायची...
पण तिला त्या मुलीला सांभाळाता येत नव्हत... खूप गोंडस होती ती मुलगी... तिच्या रडण्याने ट्रेन मधल्या सर्व बायकांचं लक्ष वेधलं जात होत
पण तिला त्या मुलीला गप्प करता येत नव्हत... तिच्या दुधाची बाटली काढली.. दुध पाजायचा प्रयत्न केला... उपयोग झाला नाही..
ते गोंडस बाळ रडतच होत.... 
आता प्रत्येक बाई तील आई जागी झाली होती...सगळ्याजणी  तीला बडबडत होत्या... हे सगळ बराच वेळ चालू होत
सगळ्यांना आता संशय वाटत होता कि हि तिचीच मुलगी आहे ना... कि हिने कुणाची पोर चोरली आहे..
बायका स्पष्ट पने तीला तसं विचारात होत्या... नको नको त्या प्रश्नांनी त्यांनी तीला भंडावून सोडलं
इतक्यात चेंबूर  स्टेशनवर कुणी  एका दीड शहाण्या बाईने लेडी पोलीसला बोलावले...
थोडीशी राकटच दिसणारी ती पोलीस तिच्या जवळ आली... मला सरकवून ती तिच्या बाजूला बसली आणि तिची चौकशी सुरु केली..
पोलीस बाई जरा जास्तच खडूस पने आणि अगदी सराहित गुन्हेगाराशी बोलाव तशी तिची चौकशी करत होती...
थोडा वेळ 'ती' शांत राहिली पण नंतर तिने तिची कहाणी सांगायला सुरुवात केली...
आंध्र प्रदेशच्या कुठल्याश्या छोट्या गावातली ती एका मुसलमान मुला सोबत मुंबई ला पळून आली ...
घरची परिस्थिती अगदी हलाकीची... त्यामुळे आपल्या प्रियकरा सोबत तरी आपल्याला सुखाने संसार करता येईल... हे स्वप्न बघत ती मुंबई ला आली...
स्वप्नांच्या या माया नगरीत कित्येकांची स्वप्न पूर्ण झालीयत तर कित्येकांची धुळीला मिळाली... तिचंही तेच झाल
इथे आल्यावर तीला पहिला धक्क्का बसला तो त्याच्या पहिल्या बायकोला बघून...... तिच्या सवतीनीला दोन मुली होत्या आणि त्याला मुलगा हवा होता
म्हणून त्याने हिच्याशी लग्न केलं... या सर्वातून सावरत असतानाच तीला दिवस गेले... आता तो तिची अगदी व्यवस्थित काळजी घेत होता पण तिच्या मनात भीती होती कि आपल्यालाही मुलगी झाली तर हा आपल्याला सोडेल... खूप हिम्मतीने तिने तिचे नऊ महिने पूर्ण केले... त्या प्रसुतींच्या वेदना मधेही ती देवाला मुलगा होऊ दे हेच विनवत होती... पण देवाने तीच ऐकल नाही...
तिला मुलगी झाली.... सर्व संपल... इतका वेळ हॉस्पिटल मध्ये अस्वस्थ होऊन फिरणारा तिचा नवरा तिला एकटीला टाकून निघून गेला होता...
बोटातली छोटीशी अंगठी एका नर्स ला देऊन तिने हॉस्पिटल मधून आपली सुटका करून घेतली...
ती ओली बाळनतीन तिच्या लेकीला घेऊन घरी आली... तो घरी नव्हता... त्याची बायको होती...त्या बाई ने तीच बाळंतपण काढल...
तो घरी आलाच नाही... चार महिने लोटले... आता त्याच्या पहिल्या बायकोनेही तिची साथ सोडली... तिला घरातून हाकलल...
काय करायचं? कुठे जायचं? या विचारात ती निघाली... रस्त्यावर दिवस काढले...  लोकांच्या वखवखलेल्या  नजरा तिला बोचत होत्या...
तिने गावी जायचं ठरवलं... नवीन जीवनाला सुरुवात करायची..
पण आपल्याला लोकांच्या संघर्षाला सामोरे जावं लागणार हे तिला ठाऊक होत...
 कुणी साथ देणार नाही हे देखील तिला माहित होत... तरीही निघाली... आपल्या बाळाला तरी चांगल जीवन द्यायच्या उद्देशानं...
बेलापूर हून विटीला आणि विटी हून आपल्या गावी...
पण बायकाच बायकांना पुढे येऊ देत नाहीत... अगदी तसच... पण सर्व बायकांनी तिला चोर ठरवून टाकल होत... तेही तिच्याच बाळाला चोरल्याचा आरोप ठेवला तिच्यावर... खूप मुश्किलीने उचलेल्या तिच्या पावलांना लगाम घालायला सर्वजणी सरसावल्या होत्या....
ती अगदीच थकलेली दिसत होती... आपल्या आईचे दुख ऐकून आता  ते बाळहि शांत झाल होत...
पान या प्रसंगामुळे आता ती तयार होती जगाला सामोरे जायला...
त्याने दिलेल्या दुखातून सावरून स्वताला सिद्ध करायला....

रविवार, १३ मार्च, २०११

चूक कुणाची ?
त्याच्या कामात आता त्याचा जम बसला होता... आता त्याला वेळ मिळू लागला...
त्याला तिची आठवण येऊ लागली... मनाशी चुकचुकला....
त्याने ठरवलं तिला भेटायला जायचं... पण आधी तिला कळवलं पाहिजे म्हणून त्याने फोन उचलला...
त्यावेळी त्याला जाणवलं किती दिवसांनी आपण तिच्याशी बोलणार...
कामाच्या व्यापात ती कशी आहे याचीही कधी चौकशी केली नाही.... याची त्याला जाणीव झाली...
या विचाराने अस्वस्थ झालेल्या त्याने तिला फोन लावला...
दिस नंबर डझ नॉट exist .... परत फोन ट्राय केला... पुन्हा तेच...
आता तो अगदीच अस्वस्थ झाला... काय करावे सुचेना...
त्याला तिच्या ऑफिसची आठवण झाली...
त्याने लगेच तिथे फोन लावला... तिच्या मैत्रिणीने फोन उचलला.... त्याने तिच्याबाद्द्दल विचारले... तो उत्सुक होता... आता तिचा आवाज ऐकायला मिळेल... मी येतोय हे सांगायचे होते त्याला...
तीचा आनदाने बहरून गेलेला आवाज ऐकायला तो आतुर झाला होता
त्याने तिच्याबद्दल विचारलेले ऐकून तिची मैत्रीण शांत झाली...
काय बोलावे काही कळत नव्हते तिला...
शेवटी तिने त्याला सांगितले....
now  she  is  no  more  ....
तो स्तब्ध झाला... त्याचा त्यःच्या कानावर विश्वास बसेना...
त्याने पुन्हा तिच्याबद्दल विचारले...
मैत्रीण पुन्हा म्हणाली... she  is  no  more  ....  खूप वाट बघितली तिने तुझी...
पण तू नाही आलास... शेवटी ज्या समुद्राच्या, मावळत्या सूर्याच्या साक्षीने तुम्ही सोबत राहायच्या शपथा घेतल्या त्याच समुद्राला तिने स्वतःला अर्पण केलं...
तो गप्प होता... त्याचा कशावरच विश्वास बसत नव्हता... ताडकन उठून तो तिच्या शहरात आला
खूप शोधलं त्याने तिला ती कुठेच नव्हती...
कशी असेल ती कुठे?... कारण ती या जगातच नव्हती.... सोडून गेली होती ती त्याला.
तो त्या समुद्राजवळ आला... त्यःच्या किनार्यावर घुडगे टेकून बसला... आज समुद्र शांत होता... आवाज फक्त त्याच्या रडण्याचा होता.
 ज्या ठिकाणी आम्ही एकमेकांना भेटलो... त्याच ठिकाणी तिने जीव दिला... का अस केलस?
मी तुझा आहे या गोष्टीवरचा विश्वास कसा ढळला तुझा?
काही दिवस लांब गेलो तर तू माझ्या वरच अविश्वास दाखवलास?
 आता तू मला उत्तर दे कि मी कसं जगू तुझ्या शिवाय?
जगू कि तुझ्या सारखच जीव देऊ?
.
.
ती गेलीय. तो एकटा आहे.  काय साध्य झाल दोघानाही... त्याने कामा सोबत तिच्याकडेही लक्ष दिले असते तर आज ती त्याच्या सोबत असती. जर तिने स्वतःला कामात गुंतवून आपला वेळ घालवला असता आणि त्याची वाट बघितली असती तर तो आज एकटा राहिला नसता....कुठलीही गोष्ट करताना स्वतः सोबत इत्तारांचाही विचार करा...
हा विचार न त्याने केला ना तिने....

शनिवार, १२ मार्च, २०११

प्रेम

प्रेम
नेहमी वाटायचं कि ती त्याला खूप चांगली ओळखते...
लांब राहूनही त्यांच्यात खूपच कमी अंतर आहे.... तो फक्त तिचा आहे... फक्त तिचा
आनंदात होती... तिच्या स्वप्नांच्या जगात वावरत होती... त्या स्वप्नात तिचा  संसार उभा करत होती...
त्याचही तिच्यावर खूप प्रेम होत... दोघ शरीराने एकमेकांपासून खूप लांब होती पण त्यांची मने जुळलेली होती...
सहा महिन्यात एकदा भेटायचे... खूप खुष असायचे... त्या दोन दिवसात सहा महिने पुरेल इतक प्रेम करायचे एकमेकांवर...
जीवापाड प्रेम करणाऱ्या त्या दोघांना जगाची नजर लागली...  नियती रागावली त्यांच्यावर...
त्याला प्रमोशन मिळाल... त्याच काम वाढलं, त्याला तिला भेटन शक्य होत नव्हत....
ती त्याची वाट बघत होती... दररोज त्यांच्या प्रेमाचा साक्षी असलेल्या त्या समुद्राला विचारात होती कि कधी येईल माझा सखा?
तो कामात इतका गुंतला होता कि त्याला तिच्या कडे लक्ष द्यायलाही वेळ नव्हता...
त्याच लक्ष न देन तिच्या जिव्हारी लागत होत... ती त्याला यायला विनवत होती पण त्याच्यावर काहीच फरक पडत नव्हता...
एकीकडे त्याला त्याच करिअर साद घालत होत तर दुसरीकडे त्याची प्रेयसी...
पण त्याला तिच्या हाके पेक्षा त्याच्या करिअर ची साद ऐकू आली
त्या सर्व आवाजात तिचा आवाज दबत गेला...
शेवटी दमली ती हाक मारून मारून...
परत एकदा त्या समुद्र जवळ गेली... किमान तो तरी माझा आवाज ऐकेल य अपेक्षेने...
पण आज त्याचीही इच्छा नव्हती तिचा आवाज ऐकायची...
त्याचा खळखळाट सुरूच होता... तिचा आवाज आणखी दबत गेला...
त्याच्या किनार्याशी उभी असलेली ती त्याला ऐकू जाव म्हणून त्याच्या जवळ जवळ जात राहिली...
जितक त्याच्या जवळ जात होती तितका त्याचा आवाज वाढत होता... तिचा आवाज दबत होता...
ओरडून  ओरडून तिच्यातल बळ संपल... तिने स्वतःला समुद्राच्या हवाली केल...
सगळ संपल... समुद्र शांत झाला होता पण आता तिचा आवाज नव्हता... ती शांत होती...
तिच्या हाका संपल्या होत्या...
इतके दिवस तिला शांत राहून साथ देणार समुद्रही तिचा शेवटचा शब्द ऐकायला तयार नव्हता...